'जलजीवन ' साठी ४०० कोटीहून अधिक निधी

KolhapurLive


उत्तुर, ता. जलजीवन मिशन योजनेअतर्गत पाणीपुरवठा योजनासाठी कागल , गडहिंग्लज व उत्तर विधानसभा मतदारसंघात ४०० कोटीहून अधिक निधी आणला,असे प्रतिपादन आमदार हसनमुश्रीफ यांनी केले.चिमणे ( ता. आजरा) येथे जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या प्रारंभी ते बोलत होती.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती वसंतराव धुरे होते.
     आमदार मुश्रीफ म्हणाले, पहिल्या नळपाणी योजनेची उंची जास्त असल्याने वारंवार तक्रार येत होत्या. परिणामी वीज बिलही अधिक येत होते. चिकोत्रा प्रकल्पातून योजना होत असून  पारदर्शक काम चिमणे ग्रामस्थांनी ठेकेदारांकडून करून घेणे गरेजेचे आहे. गावाला मुबलक पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करूया गावातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून चिमणी-झुलपेवाडी रस्त्यास प्राधान्य देणार आहे. यावेळी संभाजी तांबेकर, भूषण नंदावडेकर, वसंत तारळेकर यांची भाषणे झाली.
   यावेळी शिरीष देसाई, काशिनाथ तेली, वसंतराव धुरे, बी . ए.नादवडेकर, विजय वागणेकर, बबन पाटील, सुनील दिवाटे ,प्रभाकर येसादे, आनंदा बेलकर, अभिजीत मोरे, बाबुराव मोरे, गुंडू चव्हाण,सहदेव चव्हाण,  हणमंत चव्हाण, दत्तात्रय खेडेकर, उपसरपंच गुणवंता बेलकर,सुरेखा शिंदे,सुजाता नादवडेकर, वंदना येसादे व ग्रामस्थ उपस्थित होते.,सरपंच सुनील कांबळे यांनी स्वागत, प्रमोद तराळेकर यांनी सूत्रसंचालन केले.