अख्ख्या गावाचे 34 सेकंदात होत्याचे नव्हते झाले, उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर विनाश, हिमालयीन पर्वत का कोसळतात, घ्या जाणून

KolhapurLive

मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने हाहाकार माजला. ही घटना दुपारी 1.45 ला घडली आणि सर्व होत्याचे नव्हते झाले. गंगोत्री पर्वतातून वाहणाऱ्या खीर गंगा नदीला मोठा पूर आला. वेगाने वाहणाऱ्या पाण्यासोबतच मोठा ढिगारा देखील आला आणि 34 मिनिटांमध्येच थरावी गावात काहीच राहिले नाही. या घटनेचा अंगावर काटा येणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ही ढगफुटीची घटना किती जास्त भयानक होती, हे व्हिडीओवरून स्पष्ट दिसत आहे. या घटनेत 4 जणांचा जीव गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, या ढगफुटीच्या घटनेनंतर अजूनही 20 पेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत, त्यांचा शोध हा घेतला जातोय. राज्यातील अनेक भाविक हे उत्तराखंडमध्ये फसल्याचीही माहिती मिळतंय. कुटुंबिय त्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांना परत लवकर आणण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफसह लष्कराच्या तुकड्यांकडून बचावकार्य राबवले जात आहे. अनेकांना या घटनेतून वाचवण्यात यश आलंय.