चंदगड प्रतिनिधी: दौलत साखर कारखान्यातील कामगारांना व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी सरकारच्या विरोधातही अंदोलन करण्याची माझी तयारी आहे. दौलत कारखाना हा चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहीनी आहे. दौलत कारखाना शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या घामातून उभा राहीला आहे. त्यामुळे हा कारखाना शेतकरी व कामगारांच्याच मालकीचा राहील यासाठी मी सर्वोत्परी प्रयत्न करेन. दौलत साखर कारखान्यातील कामगार व कारखाना चालकांच्यामध्ये असणाऱ्या वादावर लवकरात लवकर यशस्वी तोडगा काढून हा वाद मिटवण्यात येईल असा विश्वास चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी हलकर्णी येथे आयोजित सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केला.
यावेळी पुढे बोलताना आ.शिवाजी पाटील म्हणाले, कारखाना चालकांनीही कामगारांच्या भावना समजून घ्याव्यात. इतर कारखान्यांप्रमाणेच दौलतच्याही शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला पाहीजे त्याचबरोबर कामगारांनाही न्याय मिळाला पाहीजे. कामगारांचे वेतन, वेतनवाढ, बोनस या त्यांच्या हक्काच्या गोष्टी त्यांना वेळेवर मिळाल्या पाहीजेत असे त्यांनी सांगितले. दौलतमध्ये इतर राज्यातील किंवा बाहेरील कामगारांना नोकऱ्या देण्याऐवजी येथील भुमिपूत्रांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहीजे या मताचा मी आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी व कामगारांवर आरेरावी, दमदाटी खपवून घेतली जाणार नाही. दौलत कारखाना हे चंदगडचे वैभव आहे आणि हे वैभव टिकवण्यासाठी सर्व पक्षांच्या प्रतिनीधींनी राजकीय वैमनस्य विसरुन एकत्र येण्याची गरज आहे. दौलत कारखान्याच्या समस्यांबाबत मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवीस यांचीही भेट घेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्राकडूनही दौलतसाठी विशेष पॅकेज मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न चालू असल्याचे आ.पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना माजी आ.राजेश पाटील म्हणाले, दौलत साखर कारखान्यामध्ये सध्या जो मनमानी कारभार चालू आहे त्याला आळा घातला पाहीजे तरच येथील भुमीपूत्रांना न्याय मिळेल. त्यासाठी आम्हीं सर्वजण राजकीय मतभेद विसरुन आ.शिवाजी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
यावेळी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, माजी आ.राजेश पाटील, गोपाळराव पाटील, मल्लिकार्जून मुगेरी, माजी पं.स.सभापती शांताराम पाटील, माजी पं.स.सभापती बबनराव देसाई, गोकुळचे माजी संचालक दिपक पाटील, संजय गांधी निराधार समिती चंदगड तालुका अध्यक्ष लक्ष्मण गावडे, नामदेव पाटील, रविंद्र बांदिवडेकर, भरमुअण्णा गावडा, दिग्विजय देसाई, तानाजी गडकरी, अशोक जाधव, संजय पाटील, शंकर मनवाडकर, गोविंद पाटील, सुरेश हरेर, अशोक कदम, चंद्रशेखर गावडे, रवि नाईक, पांडुरंग बेनके, चंद्रकांत किरमटे, अशोक गडदे , शेतकरी व कारखान्याचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.