“मला गुलाबभाऊ नाही, पाणीवाला बाबा व्हायचंय”, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचे विधान; म्हणाले, “पाणीपुरवठा खातं तर…”

KolhapurLive

      राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी राज्यातील पाणी प्रश्नावर भाष्य केलं आहे. पाणी प्रश्नावर राजकारण होऊ नये, असे म्हणतानाच “मला गुलाबभाऊ नाही, पाणीवाला बाबा व्हायचंय” असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पाणी पुरवठा खातं देवाच्या कृपेनं मिळाल्याचंही ते जळगावमध्ये म्हणाले आहेत. या खात्यातर्फ चांगल्या योजना राबवल्यास नावलौकिक होईल, असा आशावाद या सभेत बोलताना त्यांनी व्यक्त केला आहे.
    नागरिकांनी पाणीपट्टी नियमितरित्या भरली पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. राज्यात सरकारकडून पाण्याची समस्या सोडवण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र, या योजनांसाठी बरेचदा नागरिक सहकार्य करत नाहीत, अशी नाराजी यावेळी गुलाबराब पाटलांनी बोलून दाखवली आहे.
     दरम्यान, गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका आमदारकीपेक्षा कठिण असतात, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘चून चून के मारेंगे ठाकुर’ अशा पद्धतीचे चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत असतं, असं त्यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. “ग्रामपंचायतीची निवडणूक पक्षावर अवलंबून नसते. कार्यकर्ता ज्या विचारांचा असतो, त्या विचारांची ग्रामपंचायत बनते”, असे त्यांनी म्हटले आहे. पहिल्या लाटेत कोणीही आरामात निवडून येतो. पण दुसऱ्या लाटेत जो निवडून येतो, तोच खरा नेता असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*

🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE

Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.

Admission Open for Offline & Online Batches.


👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप करा.

📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |

📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.